महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा प्रयत्न : नाना पटोले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज ठाकरे यांनी भोंगे काढण्याासाठी दिलेल्या इशार्‍याला काहीही अर्थ नसून हा महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा प्रयत्न असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्यावर विविध नेत्यांनी टीका केली आहे. यात आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याबाबत नाना पटोले म्हणाले की, राज ठाकरे यांचा आजचा भाषण कधीकाळी त्यांना देवेंद्र फडणवीस त्यांनी सुपारीबाज म्हटलं होतं. त्याच पद्धतीच भाषण होतं. आज जनतेच्या प्रश्नावर ते बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. महाराष्ट्रात भोंग्याच्याबाबत सर्वत्र कारवाई झालेली आहे.म्हणून राज ठाकरेंच्या ४ तारखेच्या निर्वाणीच्या इशार्‍याला अर्थ नाही, असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले पुढे म्हणाले की, राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे, तो थांबवला पाहिजे. या शब्दांमध्ये नाना पटोले यांनी राज ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

Protected Content