भगवा रंग शौर्य आणि विजयाचे प्रतीक : आठवले

मुंबई प्रतिनिधी । भगवा रंग हा शौर्य आणि विजयाचे प्रतिक असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टिम इंडियाच्या नवीन भगव्या जर्सीचे स्वागत केले आहे.

भारतीय क्रिकेट संघ लवकरच भगव्या रंगाच्या नवीन पोशाखात दिसणार आहे. यावरून आता वादा सुरू झाले असून अनेक नेत्यांनी याच्या विरोधात सुरू लावला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी याच्या विरोधात तोफ डागली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामसाद आठवले यांनी मात्र या बदलाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, भगवा रंगा हा बौध्द भिख्खूंच्या वस्त्राचा रंग असून शौर्य आणि विजयाचे प्रतीक आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघाला या रंगाची नवीन जर्सी घालण्यात कोणतीही अडचण नसल्याचे आठवले म्हणाले.

Protected Content