वसुंधरा टीम येण्याची चाहूल लागताच नगरपंचायतीकडून साफसफाईची कामं सुरू

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरामध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असून नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे. परंतु ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’  यासंदर्भात मुक्ताईनगर  शहराची स्वच्छतेविषयी पाहणी करण्यासाठी ‘वसुंधरा टीम’ येत असून मुक्ताईनगर येथील नगरपंचायत लागलीच घाणीचे साम्राज्य लपवण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येत आहे.

‘वसुंधरा टीम’ मार्फत येणारे अधिकारी यांनी भ्रमणध्वनीद्वारे नगरपंचायत प्रशासनाला कळविले असल्याचे यावरून समजत आहे. यामागचा वसुंधरा टीमचा हेतु काय असे कळवून जर वसुंधरा टीम पाहणी करण्यासाठी येत असली तर मुक्ताईनगर नगरपंचायतला ‘स्वच्छ व सुंदर भारत’ या मार्फत मिळणारे बक्षीस तरी काय कामाचे ? असा प्रश्न मुक्ताईनगर येथील नागरिक उपस्थित करत आहेत.

मुक्ताईनगर येथील घनकचरा हा सुका व ओला असा वेगळा जमा केला जातो परंतु डम्पिंग ग्राउंड वरती एकत्र गाडी खाली होत असून यामधील सुका कचरा ओला कचरा असा विलगीकरण याचा विभाग त्या ठिकाणी आखलेला नसतो यामधून नगरपंचायतीचे लाखो रुपयांचे नुकसान होत असूनसुद्धा एक दिवसीय सुका कचरा ओला कचरा प्लास्टिक या बाबत विलगीकरण असा कार्यक्रम नगरपंचायत थाटत असून फक्त देखावा म्हणून जर हा कार्यक्रम होत असेल व देखाव्यावरती वसुंधरा टीम खुश होत असणार तर या मेहरबानीचे कारण तरी नागरिकांना समजले पाहिजे असा नागरिकांना प्रश्न पडला आहे.

डम्पिंग ग्राउंडवर जमा झालेला कचरा वसुंधरा टिम येताच नदीपात्रात ढकलला जातो तरीसुद्धा वसुंधरा टीम त्यांना पुरस्काराने सन्मानित करत असेल तर या मागचा हेतू काय ? असाही प्रश्न नागरिक उपस्थित करून चर्चा करत आहे.

Protected Content