दिल्लीत जागा मिळाली तर अण्णा हजारे करणार आंदोलन !

राळेगणसिध्दी । शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी दिल्लीतील रामलीला किंवा जंतर मंतर येथे जागा मिळाली तर आपण आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे.

दिल्ली आंदोलनातील शेतक़र्‍यांच्या मुलांनी राळेगणसिद्धीत येऊन अण्णांची भेट घेतली. याप्रसंगी अण्णांनी आपण शेतकर्‍यांसोबत असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, आपण शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर दोनदा आंदोलन केले. मोदी सरकारने दिलेले लेखी आश्‍वासन पाळले नाही. दिल्लीतील शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

तसेच दिल्ली येथील रामलिला मैदान अथवा जंतर-मंतर येथे जागा मिळाल्यास आंदोलन करण्याची इच्छा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. हे आपल्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Protected Content