कारने दुचाकीला उडविले : अमळनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू

अमळनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगाने धावणार्‍या कारने दुचाकीला उडविल्याने झालेल्या अपघातात अमळनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, नरडाणा जवळ भरधाव वेगाने धावणार्‍या अज्ञात कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील पंढरीनाथ गणपत वारुडे (वय ५५, रा. नगाव, ता. अमळनेर) आणि आशा शालिग्राम मराठे (वय ४५, रा. बाजार समितीजवळ, अमळनेर) हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचार सुरू करण्याआधीच पंढरीनाथ वारूडे यांची प्राणज्योत मालवली. तर, गंभीर जखमी झालेल्या आशाबाई यांना हिरे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. हा अपघात काल सायंकाळी घडला असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत धुळे शहर पोलिस ठाण्यात अज्ञातच कारचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content