राज्यातील प्रत्येक शाळेत राष्ट्रगीत, प्रतिज्ञासोबतच ‘हे’ नवीन गीत म्हटले जाणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील प्रत्येक शाळेत मुलांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी, भारतीय संस्कृतीची त्यांना माहिती व्हावी, चांगले संस्कार निर्माण व्हावे, यासाठी नियमित राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा होत असते. राज्य सरकाराने आता आणखी एक नवीन गीताचा समावेश यात केला आहे.

जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आता राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये नियमित म्हटले जाणार आहे. यासंदर्भात शासनाकडून आदेश काढण्यात आले आहे. या गीताच्या माध्यमातून बालपणीच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची गौरवगाथा कळणार आहे. ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मागणी केली होती. त्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना प्रत्येक शैक्षणिक संस्थेत राज्यगीत वाजविले अन् गायिले जावे अशी आग्रही अपेक्षा व्यक्त केली. या पत्राचा सकारात्मक परिणाम शासन दरबारी झाला. पत्रानंतर तीन आठवड्यांच्या आतच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शासन आदेश / परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्रत्येक शाळेत दररोजचे वर्ग सुरू होताना राष्ट्रगीत/ प्रार्थनेसोबत राज्यगीत वाजवले/ गायले जाईल, याची दक्षता शाळा व्यवस्थापनांनी घ्यायची आहे. या सूचनेचे पालन होत आहे ना, याची दक्षता सर्व विभागीय शालेय शिक्षण उपसंचालकांनी घ्यायची आहे, असे पत्रक राज्यशासनाने काढले आहे.

जय जय महाराष्ट्र माझा या गीतास राज्यगीताचा दर्जा महाराष्ट्र राज्य सरकारने दिला. वर्षभरापूर्वी हे गीत राज्यगीत झाले. त्यानंतर या गीताला त्याचा उचित सन्मान मिळत नव्हता. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत आपलं हे राज्यगीत गायले जात नव्हते. अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे राज्यातील शाळांमध्ये राज्यगीताचा सन्मान होत नसल्याची बाब राज्य सरकारच्या, विशेषत: शालेय शिक्षण विभागाच्या लक्षात आली. म्हणूनच शालेय शिक्षण विभागाने हे परिपत्रक काढले आहे.

Protected Content