ॲड. मुकुंद जाधव यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान

सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला गौरव

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील कवी,  गझलकार ॲड. मुकुंदराव जाधव यांच्या ” मनाच्या नजरेतून” या काव्यसंग्रहाबद्दल मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे त्यांची सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राजस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली. त्यांना कराड जि. सातारा येथील कवी संमेलनात रविवारी २९ रोजी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अखिल भारतीय साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे निवडक प्रस्तावामधून ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव यांच्या “मनाच्या नजरेतून” या काव्यसंग्रहाची सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राजस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा गौरव झाला. सदर पुरस्कार सुप्रसिद्ध कवयित्री रेखा दिक्षीत, अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक घुमटकर, उपाध्यक्ष ललीता गवांदे, कवी- संमेलन अध्यक्ष प्राचार्य  सुप्रसिद्ध कवी सुनिल दबडे, डाॅ. नीता बोडके, सिध्दार्थ कुलकर्णी, वर्षा थोरात, हेमा जाधव, पल्लवी भोसले  या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलेला आहे.

 

सांगली येथिल जिल्हा न्यायाधीश  पुरूषोत्तम जाधव कार्यक्रमास उपस्थित होते. जळगांवहून ॲड. मुकुंदराव जाधव यांच्यासोबत ॲड. सुनिल तारे, ॲड. हेमंत काकडे, ॲड. हेमंत भंगाळे, ॲड. शेखर चांदसरकर, ॲड. निखिल कुलकर्णी, ॲड. योगेश गावंडे, ॲड. अब्दुल कादिर, ॲड. सुनिल पाटील, ॲड. विजय बारी, प्रविण भोळे हे कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

ॲड. मुकुंदराव जाधव हे मुळचे पातोंडा, ता. चाळीसगांव येथिल रहिवासी असून गेल्या २३ वर्षापासून जळगाव येथील जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसाय करीत आहे. “मनाच्या नजरेतून” हा काव्यसंग्रह २६ फेब्रुवारी २०२३ रोजी जळगांव येथे प्रकाशित करण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातून ॲड. मुकुंदराव जाधव यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

Protected Content