कंपनीत काम करतांना वीजेच्या धक्क्याने प्रौढाचा मृत्यू

जळगाव-लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील पंचरत्न कंपनीत काम करतांना वीजेच्या धक्क्याने ५२ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भिमराव धोंडू पाटील (वय-५२) रा. लमांजन ता.जि.जळगाव ह.मु. शिरसोली जळगाव असे मयत प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील लमांजन रहिवाशी असलेले भिमराव पाटील हे आपल्या पत्नीसह जळगाव तालुक्यातील  शिरसोली येथे वास्तव्याला होते. ते जळगाव एमआयडीसीतील पंचरत्न कंपनीत कामाला होते. नेहमीप्रमाणे बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास कंपनीत काम करत असतांना त्यांन विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांना तातडीन जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणूका भंगाळे यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी व चार भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content