शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील एका भागात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेला कारण नसतांना शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना सोमवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवार ९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता तीन जणांविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात २५ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, सोमवारी ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता महिला ही घरी असतांना त्याच परिसरात राहणारे आनंद कचरू गारूडी, कल्पना वंजारी आणि अर्चना वंजारी यांनी महिलेला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने मंगळवारी ९ एप्रिल रोजी राद्धी ८ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली त्यानुसार आनंद कचरू गारूडी, कल्पना वंजारी आणि अर्चना वंजारी या तिघांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उषा सोनवणे हे करीत आहे.

Protected Content