चिडवल्याच्या कारणावरून तरूणाला तिघांकडून मारहाण; एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बोरनार येथे काहीही कारण नसतांना चिडवत असल्याचा जाब विचारल्याने एका तरूणाला तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना गुरूवारी ७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील बोरनार येथे आवेश गुलाम रसूल शेख वय २० हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवारी ७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता आवेश गुलाम शेख रसूल हा गावातील मस्जिद चौकात उभा होता. त्यावेळी गावात राहणारे कुणाल सोनवणे, सौरभ चौधरी आणि जयेश चौधरी यांनी आवेशला काहीही कारण नसतांना चिडवत होते. याचा जाब आवेशने विचारला असता याचा राग आल्याने तिघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. आवेशची बहीण भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिलादेखील शिवीगाळ करीत तिची पोत तुटल्याने नुकसान झाले. या प्रकरणी तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहेत.

Protected Content