जुन्या वादातून तरूणाला चौघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादातून तरूणाला एकाने शिवीगाळी करून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्यासुमारास समता नगरात घडली आहे. याप्रकरण रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील समता नगरात अनवर शेख इब्राहिम शेख (वय-३०) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता अनवर शेख हा घरी बसलेला असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून गल्लीत राहणारा तमविर पठाण , साहिल पठाण, अल्तमश पठाण, जुबेर न्याजू शेख यांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच चाकू सारख्या वस्तूने हातावर वार करून जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतर अनवर शेख इब्राहिम शेख याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी २७ सप्टेंबर रोजी रात्री उशीरात संशयित आरोपी तमविर पठाण , साहिल पठाण, अल्तमश पठाण, जुबेर न्याजू शेख सर्व रा. समता नगर, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे करीत आहे.

Protected Content