पायी जात असलेल्या महिलेचा पाठलाग करून केला विनयभंग; तीन जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |भुसावळ शहरातील शांती नगरात राहणाऱ्या २१ वर्षीय महिलेचा पाठलाग करून हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात २१ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान भुसावळ शहरातील शांतीनगर परिसरातून पायी जात असतांना तेजस सपकाळे, कुणाल हटकर आणि एक अनोळखी इसम यांनी तिचा पाठलाग करून तिच्या अंगावरील कपड्यांची ओढता करून तिचा विनयभंग केला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अजून तक्रार दिली आहे. त्यानुसार दुपारी ३ वाजता संशयित आरोपी तेजस सपकाळे, कुणाल हटकर दोन्ही रा. भुसावळ आणि एक अनोळखी व्यक्ती अशा तीन जणांनी विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सय्यद हे करीत आहे.

Protected Content