बांग्लादेश हिंसाचारामुळे संत्रा उत्पादकांना नुकसान

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठे संत्रा उत्पादक क्षेत्र नागपुरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन केले जाते. बांगलादेशातून या संर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण बांगलादेशातील हिंसाचारामुळे संत्र्यांची निर्यात पूर्णपणे रखडली आहे. त्यामुळे दर हंगामात बांगलादेशात होणा-या अडीच टन संत्र्यांच्या निर्यातीला फटका बसला असून शेतक-यांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

बांगलादेशातील परिस्थीती अजूनही जैसे थे आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे हिंसाचार उफाळून आला होता. मात्र या परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. गेल्या काही वर्षांत बांगलादेशाने हिंदुस्थानातून येणा-या संत्र्यांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले होते. मात्र तरीही बांगलादेशातील संत्र्यांची मागणी कमी झाली नव्हती. त्यामुळे शेतक-यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून संत्रा उत्पादनात वाढ केली. जेणेकरून यावर्षी देखील संत्र्यांचा दुप्पट प्रमाणात खप होईल. पण आता बांगलादेशातील अराजक स्थितीमुळे एकही व्यापारी बांगलादेशात संत्रा घेऊन जायला तयार नाही.

Protected Content