Home Cities जळगाव आरटीई प्रवेश सोडतीकडे लागले पालकांचे लक्ष

आरटीई प्रवेश सोडतीकडे लागले पालकांचे लक्ष

0
28

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले होते. याची मुदत गेल्या १० मार्च रोजीच संपली असून आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातून साठी ८ हजार ३९५ अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

शैक्षणिक वर्ष २०२२- २३ साठी आरटीई कोट्यातून २५ टक्के प्रवेश दिले जातात. यासाठी ओंनलाइन अर्ज १० मार्च पर्यंत मागविण्यात आले होते. जिल्ह्यात ८ हजार ३९५ पालकांकडून विद्यार्थ्यांसाठी ओंनलाइन पोर्टलवर प्रवेश अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील मान्यता असलेल्या शाळांपैकी २८५ शाळांमध्ये आरटीई कोट्यातून २५ टक्के प्रवेश देण्याचे निर्देश आहेत. यात ३ हजार १४७ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मर्यादा निश्चिती करण्यात आली आहे. यात १० मार्च पर्यंत ८ हजार ३९५ पालकांकडून त्यांच्या पाल्यांसाठी ओंनलाइन अर्ज दाखल आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सोडत दिनांक अजून निश्चित नसली तरी पालकांकडून या प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा केली जात आहे.


Protected Content

Play sound