शेतकरी आंदोलन : आणखी एका मित्र पक्षाने भाजपाची साथ सोडली

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत आणखी एका मित्र पक्षाने एनडीएची साथ सोडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने आज एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी या अगोदर अकाली दलने देखील भाजपाची साथ सोडलेली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता जवळपास महिना झाला आहे. अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्याने, आता हे आंदोलन अधिकच तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत. शिवाय, शेतकरी संघटना देखील आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. दुसरीकडे, केंद्र सरकारकडून हे आंदोलन थांबावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत

“भारत सरकरारद्वरे आणल्या गेलेल्या कृषी विरोधी कायद्यांमुळे आज राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी) एनडीए आघाडीतून वेगळं होत असल्याची घोषणा करत आहे.” असं राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी)चे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी जाहीर केले.

या अगोदर शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी)चे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी तीन संसदीय समित्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना पाठवला होता. तसेच, या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हनुमान बेनीवाल हे आता जयपूर, जोधपूर, कोटपुतली, अलवर, नागौर, जैसलमेरसह राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमधील शेकडो शेतकऱ्यांना घेऊन हरियाणा बॉर्डरच्या शाहजहांपूरकडे निघाले आहेत.

Protected Content