जयपूर : (राजस्थान ) : वृत्तसंस्था । एक-दोन नाही तर सहा राज्यांमध्ये ऑपरेशन लोटस राबवून तिथलं सरकार पाडण्याचा भाजपाचा डाव होता असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.
एकूण पाच राज्यांमध्ये फोडाफोडी करुन सरकार आणायचं आणि सहावं राज्य राजस्थान होतं मात्र भाजपाचा डाव फसला. आमचे काही आमदार त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. त्यांचं त्यावेळचं वर्तन पाहून काँग्रेसच्या आमदारांना त्यांच्याबद्दल लाज वाटली. आपल्या देशाने एक काळ असा पाहिला की त्यावेळी आपल्या देशाचे गृहमंत्री हे सरदार पटेल होते आणि आज अमित शाह यांच्यासारखा माणूस आहे असं म्हणत गेहलोत यांनी अमित शाह यांच्यावरही टीका केली आहे.