हतनूरचे ४१ दरवाजे उघडले… गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्र आहे. या क्षेत्रात आज दिवसभर दमदार पाऊस झाल्याने सायंकाळी धरणाचे ४१ दरवाजे पुर्ण उघडण्यात आले असून गावकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज दि. २२ जुलै रोजी सायंकाळी ८ वाजता तापी नदीपात्रात ६२६१३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. रात्री पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content