२६/११ चा हल्ला पाकिस्तान आणि तत्कालीन यूपीए सरकारच्या संगनमताने : आर. वी. एस मणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुंबईच्या ताज हॉटेलवर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान आणि तत्कालीन यूपीए सरकारच्या संगनमताने झाल्याचा गंभीर आरोप गृह मंत्रालयाचे माजी सचिव आर. वी. एस मणी यांनी केला आहे. मणी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीने पुस्तक ‘हिंदू टेरर- इनसायडर अकाउंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर’च्या प्रकाशनादरम्यान हे विधान केले आहे.

 

 

मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्या दरम्यान काँग्रेसला ट्रागेट करण्यात आले आहे. त्यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयातील जास्त करून अधिकारी दहशतवादावर होणाऱ्या वार्षिक गृह सचिव स्तरावरच्या चर्चेसाठी इस्लामाबादला पाठवण्यात आले होते. ही चर्चा पाकिस्तानला 25 नोव्हेंबर 2008 रोजी होणार होती. मात्र तिथे गेल्यानंतर ती तारीख 26/11 करण्यात आली. त्यावेळी मी लखनऊला होतो. आणि त्याचदरम्यान मध्यरात्री हा हल्ला करण्यात आला.

 

 

‘हिंदू टेरर- इनसायडर अकाउंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर’च्या या पुस्तकातील भगवा दहशतवाद एक षडयंत्र यावर एक चर्चासत्र झालं. चर्चेत म्हणाले की, मी काही राजकीय व्यक्ती नाही आणि पुस्तक प्रकाशनासाठी भोपाळला आलो आहे. हिंदू दहशतवाद ही एक जाणूनबुजून निर्माण करण्यात आलेली संकल्पना आहे. ही संकल्पना त्यावेळच्या केंद्र सरकारमधील काही मोठे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून पसरवली होती. त्यानंतर त्याचे पुरावे शोधण्यात आले. केंद्र सरकारचा काय उद्देश होता ते माहीत नाही. याच दरम्यान ‘द ग्रेट इंडियन कांस्पिरेसी’ आणि ‘आतंक से समझौता’चे लेखक आणि पत्रकार प्रवीण तिवारी यांनीही काँग्रेस नेत्यांवर हिंदू दहशतवाद संकल्पना रुजवण्याचा आरोप केला होता. मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या गळ्यात हिंदू धर्माचे लॉकेट घालण्यात आले होते, जर कसाबला जिवंत पकडलं नसतं, तर सर्व दहशतवादी हिंदू घोषित करण्यात आले असते, हे एक षडयंत्र होते,असे देखील श्री.मनी यांनी म्हटले आहे.

Add Comment

Protected Content