यावल, प्रतिनिधी | तालुका संजय गांधी निराधार योजनेबाबतची बैठक आज (दि.२०) सकाळी येथे होवुन यात तालुक्यातील एकुण १७३ लाभार्थांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, येथील तहसीलदार जितेन्द्र कुवर आणि निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार व संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष विलास चौधरी, समिती सदस्य संजय भालेराव, ज्ञानदेव बेंडाळे, प्रकाश कोळी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेची ३९, इंदिरा गांधी भूमिहीन योजनेची ५५ प्रकरणे, श्रावणबाळ योजनेची ५४ अशी एकूण १७३ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी २५ लाभार्थ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकुन आर.डी. मिस्त्री व कार्यालयीन कर्मचारी रहेमान तडवी यांनी सहकार्य केले.