हुंड्याच्या पैशांसाठी शिवाजी नगरातील विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नात कमी हुंडा दिला नाही अजून पैसे पाहिजे होत असे बोलून शिवाजी नगरातील विवाहितेला शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबबात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवाजी नगरातील माहेर असलेल्या गौरी जयदिप देशमुख (वय-३२) यांचा विवाह अहमदनगरातील संगमनेर येथील जयदिप देशमुख सतीष देशमुख यांच्याशी रितीवाजानुसार झाला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती जयदीप देशमुख याने लहान सहान गोष्टींवरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू आणि चुलत सासू यांनी लग्नात हुंडा कमी दिला, आम्हाला अजून पैसे पाहिजे असे सांगून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर विवाहितेला शिवीगाळ मारहण करत दमदाटी केली आणि घटस्फोट देण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. मंगळवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती जयदीप सतीष देशमुख, सासून स्वाती सतीष देखमुख, चुलत सासू सुजाता अमरसिंग देशमुख, चुलत सासरे अमरिंसग देशमुख, दुलत दिर वेदांत अमरसिंग देशमुख, आते सासू सुरेख धुमाळ, माम सासरे अजय धुमाळे सर्व रा. संगमनेर जि. अहमदनगर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content