यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील मनवेल येथील रहिवासी ईश्वर भागवत पाटील हे सैन्य दलातून १ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले असून आज त्यांचे गावात आगमन झाले. त्यांचे ग्रामस्थांनी आतिषबाजी करत मिरवणूक काढून स्वागत केले.
मनवेल येथील धुनीवाले दादाजींच्या प्रवेशद्वार येथे ईश्वर पाटील यांचे आगमन होताच फटाक्याची आतीषबाजी करीत गावकंऱ्यानी जय जवान, जय किसान , भारत माता की जय अशा घोषणा देत सेवानिवृत्त सैनिकाची गावात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ईश्वर पाटील यांच्या हस्ते बसस्थानक जवळ महर्षी वाल्मिक महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पुजन व पुष्पहार अपर्ण करण्यात आले. तेसच हिन्दवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,श्री दादाजी दरबारमध्ये पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले. ईश्वर पाटील यांच्या निवासस्थानी मिरवणूकीची सांगता करण्यात आली. यावेळी वढोदा सरपंच संदीप सोनवणे यांनी सेवानिवृत्त सैनिक व पत्नीसह आई वडील यांचा सत्कार केला. मिरवणुकीमध्ये गावातील विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी पुष्पहार देऊन स्वागत केले.