सरपंच निवड ग्रामपंचायतीतूनच ; विधेयक मंजूर !

uddhav thackera 11

मुंबई (वृत्तसंस्था) सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचे विधेयक आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता थेट जनतेतून सरपंच निवड होणार नाही.

 

सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपालांनी नकार दिला होता. त्यामुळे आज विधानसभेत सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपने याला विरोध केला आहे. मात्र जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी समोर आल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

Protected Content