संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा इशारा

 

मुंबई : वृत्तसंस्था ।   सोमवारच्या आत राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी  अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवेदन करावं, नाहीतर आम्ही राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

 

भाजपानं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरण्याची पूर्ण तयारी केली असून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. “सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.

 

या मुद्द्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांच पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलताना “मुख्यमंत्री सत्यवादी असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही” असं म्हटलं होतं. त्याचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत. पण व्यवहारात ते दिसत नाही. भूमिका घेताना त्यांना स्वत:च्या खुर्चीची काळजी आहे. त्यामुळे संजय राऊतांना ते सत्यवादी कुठे दिसले, ते माहीत नाही.”

Protected Content