मुंबई (वृत्तसंस्था) हिंदू मुसलमान दंगल घडवण्याचा संघाचा डाव आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद हा शांततेच्या मार्गाने पुकारलेला बंद आहे. या बंदला काही लोक जाणीवपूर्वक हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू मुसलमान दंगल घडवण्याचा संघाचा डाव आहे, असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. आम्हाला तोडफोड करायची असती तर त्याची सुरुवातच हिंसक केली असती. मात्र आम्हाला तसे काहीही करायचे नाही. तसेच हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.