चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील शेवरी येथील २२ वर्षीय तरूण बेपत्ता झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील शेवरी येथील अनिल शिवाजी पवार (वय-२२) या तरूणाने ६ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घरच्यांना रा.वि.कॉलेज चाळीसगाव येथे जाऊन येतो असे सांगून गेला. मात्र तो आजपावेतो घरी परतला नाही. त्यावर घरच्यांनी शेत शिवारात व नातेवाईकांकडे अद्यापपर्यंत शोधाशोध केली असता अनिल हा मिळून आला नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान भाऊ विजय शिवाजी पवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भालचंद्र पाटील हे करीत आहेत.