शिवजयंतीसाठी नवीन नियमावली जाहीर; १०० जणांना परवानगी

 

 

मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारच्या गृह खात्याने शिवजयंतीसाठी काल सायंकाळी जाहीर केलेल्या नियमावलीत आज बदल केला असून आता दहा ऐवजी १०० जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

 

शिवजयंती साजरी करताना केवळ १० जणांच्या उपस्थितीत साजरी करावी असं परिपत्रक गृह विभागाकडून काढण्यात आलं होतं, परंतु ठाकरे सरकारच्या या निर्णयावर शिवप्रेमींकडून टीका होत असताना पुन्हा यातील चूक सुधारत गृह विभागाने दुसरं शुद्धिपत्रक काढलं, यात म्हटलं आहे की, शासन परिपत्रक ११ फेब्रुवारी २०२१ मधील मुद्दा ३ मधील ओळ क्रमांक ४ मध्ये सुधारणा करण्यात येत असून आता १० ऐवजी १०० असे वाचावे, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

 

त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना १०० जणांच्या उपस्थितीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

Protected Content