शिरसोली येथे विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

 

जळगाव, प्रतिनिधी । विहरीत उडी घेवून शिरसोली येथील युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील रविंद्र यशवंत वाघ (४०) यांनी सटवाई शिवारातील भागवत रामदास बारी यांच्या शेतातील विहरीत शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सालदाराच्या लक्षात आल्याने त्याने याबाबतची माहिती शेतमालक भागवत बारी यांना दिली. त्यांनी पोलीस पाटील यांना घटनेची माहिती देत घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गावकर्‍यांच्या मदतीने रविंद्र यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला आहे.  रविंद्र वाघ यांना दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत त्यांनी विहरीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी सुमित्रा व मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Protected Content