शिधापत्रिका नसलेल्यांनी १ जून पर्यत सेतू सुविधा केंद्रात नाव नोंदणीचे आवाहन

जळगाव,प्रतिनिधी । राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अथवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या बिगर शिधापत्रिकाधारकांना मे व जुन या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदुळ देण्यात येणार आहे. या करीता बिगर शिधापत्रिकाधारकांनी सेतू सुविधा केंद्रात १ जुनपर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

बिगर शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदुळ वितरणाकरीता मजुरांच्या स्थलांतरासाठी केलेल्या नियोजनामधुन कामगार/मजुर इ. बिगर कार्डधारकांची स्थानिक यंत्रणा तसेच संबंधीत गावाचे तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे आधारकार्डासह सदस्यांची नावे द्यावी. तसेच शहरी भागातील मनपा हद्दीतील बिगर शिधापत्रिकाधारकांनी तहसिल कार्यालय आवारातील सेतू सुविधा केंद्रात १ जुन पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ४ यावेळेत नाव नोंदणी करावी. असे जळगाव तहसिलदार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content