विना मास्क फिरणारांवर चैतन्य तांडा येथे पोलिसांची कारवाई

 

 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढत असताना विना मास्क फिरणारे  वाढत आहे. याची दखल घेत पोलिस प्रशासन व चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने येथील बायपासला विना मास्क फिरणारांवर  कारवाई  केली

 

चाळीसगाव तालुक्यात काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. त्यात विना मास्क फिरणारांची  संख्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. चैतन्य तांडा व ग्रामीण पोलिस प्रशासनातर्फे विना मास्क फिरणारांवर  दंडात्मक कारवाई करण्यात आली.  कारवाई सकाळी येथील बायपासच्या विराम लॉन्स समोर सात जणांवर करण्यात आली. प्रत्येकाला दोनशे रुपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आले. दंड  वसूली चैतन्य तांडा ग्रामपंचायतीला देण्यात आली . पो  नि  संजय ठेंगे, हवालदार नंदु परदेशी, शशीकांत महाजन, ज्ञानेश्वर बडगुजर, शांताराम पवार, करगांव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, सदस्य वसंत राठोड व ग्रामसेवक के.एल.जाधव आदीं  या कारवाईत सहभागी  झाले  होते

Protected Content