विजेच्या धक्क्याने ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । विजेचा धक्का लागल्याने ११ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील परशुराम नगर येथे घडली आहे.

 

मयत किर्ती भुषण गुंजाळ (वय- ११ रा. परशुराम नगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) या अल्पवयीन मुलीला विजेचा जबर धक्का लागल्याने त्यातच तिचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली . ही घटना घडताच घरच्यांनी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे तिला  डॉक्टरांनी मयत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या जबाबानुसार चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content