वंचित बहुजन आघाडीने २४ जानेवारीला पुकारला ‘महाराष्ट्र बंद’

ad. aambedkar

पुणे, वृत्तसंस्था | केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए आणि सीएए कायद्याविरोधात येत्या २४ तारखेला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये ३५ संघटना सहभागी होणार असल्याचा दावाही त्यांनी आज (दि.१८) येथे एका पत्रकार परिषदेत केला.

 

देशाची आजची परस्थिती अराजकता माजेल अशी झाली आहे. या परिस्थितीला भाजप आणि आरएसएस जबाबदार आहेत. कारण देशात लोकशाहीचा अंश दिसत नसून हिटलरशाही दिसत आहे. धमकावणे व दहशत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशा शब्दात आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

भीती आणि दहशतवाद निर्माण झाला, ही दहशत वाढावी म्हणून तीन कायदे लागू करण्याचे काम सरकारने केले आहे, ते असंवैधानिक आणि आरएसएस प्रणित आहेत. याचा परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवर झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Protected Content