साकळीतील तरूणांकडून परप्रांतियांसाठी जेवणाची व्यवस्था

यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे परप्रांतिय मिळेल त्या रस्त्याने जात आहे. त्यांना होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तालुक्यातील साकळी येथील तरूणांनी सामाजिक बांधिलकी जोपासत जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे तहसीलदार यांनी कौतूक केले आहे.

जिल्ह्यासह राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मजूरांनी आपल्या गावाकडे जाण्यासाठी मिळेल त्या रस्त्याने व मार्गाने जात आहे. राज्यातील महामार्गावरील जाणाऱ्यांना शक्य होईल तेवढे मदत व्हावी या हेतूने यावल तालुक्यातील साकळी येथील तरूण एकत्र येत बसस्थानकाजवळ येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांना नास्ता व पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. थंड पाण्यासाठी गावातील आई ॲक्वातचे संचालक बापू साळुंखे आणि रविंद्र निळे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था सुयोग हॉटेलचे मालक विलास पाटील, शिक्षक सौरभ जैन यांनी केली तर तरूणांकडून बिस्किट पुडे उपलब्ध करून दिलेत.

तरूणांकडून जनजागृती
सदर मार्गावरून दिवसभरात महाराष्ट्राच्या सीमेवर जाण्यासाठी असंख्य वाहने जात आहेत. त्यांना प्रत्येक वेळी सोशल डीस्टसिंग पाळून जेवणाची व पाण्याची मदत केली जात आहे. सेवा देणारा प्रत्येक जण तोंडाला मास्क लावून व हात स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण करून मदत करत आहे. ग्रामस्थांच्या या सेवा कार्याचे प्रवासी वर्गाकडून तोंडभरून कौतुक केले जात आहे. शी दुर्दैवी परिस्थिती कोणावरही येऊ नये, असा भावनिक सूर त्यांच्याकडून निघत आहेत.

तहसीलदारांची भेट
यावल तहसीलदार जितेन्‍द्र कुंवर हे १६ रोजी संध्याकाळच्या दरम्यान बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावरून यावलकडे जात असताना त्यांना प्रवासी सेवा कार्याची माहिती झाल्याने त्यांनी उपक्रम राबवणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतली व मार्गदर्शन केले. आज आपल्या या सेवा कार्याची समाजाला गरज असून आपल्या सेवा कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. परंतु हे काम करीत असतांना स्वतःची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तरी सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या. सुरक्षित अंतर ठेवा व सुरक्षित रहा. असे तहसीलदार कुंवर सांगितले.यावेळी त्यांनी सेवा कार्यात सहभागी असणाऱ्या दहा वर्षाच्या लहान मुलाचे कौतुक करून भविष्यात अशाच मुलांची देशाला गरज असल्याचे सांगितले.

यांचे मिळाले सहकार्य
जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते जनार्धन साळुंके, शिक्षक सौरभ जैन, जितेंद्र वाघळे, पत्रकार मनु निळे, गणेश खेवलकर, निलेश चित्रे, सोमनाथ नेवे, विनायक सोनार, रोशन बारी, कृष्णा पाटील, नारायण मराठे, भूषण माळी, प्रकाश चौधरी, गणेश महेश्री, कल्पेश सोनार, संजय सोनार, कुंदन वानखेडे, अश्विन नेवे, मयूर बारी, भावसु बारेला यांचेसह विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Protected Content