रेल्वेच्या धक्क्याचे वयोवृध्दाचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद – आसोदा रेल्वे रूळावर कचरा वेचणाऱ्या वयोवृध्दाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम हिरामण खरोटे (वय-५८) रा. नशिराबाद हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह राहतात. हलाकीची परिस्थीती असल्यामुळे बळीराम खरोटे हे मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतात. यात रेल्वे रूळाच्या बाजूला पडलेल्या प्लॉस्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्याचे काम करतात. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद-आसोदा दरम्यान ते प्लॉस्टिकच्या बाटल्या उचलण्याचे काम करत होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू रेल्वेच्या धक्काने जोरदार फटका बसला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ऐकायला कमी येत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती मयत बळीराम खरोटे यांचा मुलागा भिमराव यांनी सांगितले, नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सरलाबाई, भिमराव आणि पवन दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास नशिराबाद पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content