रिया चक्रवर्तीला अमली पदार्थ सेवन , व्यवहाराच्या आरोपावरून अटक

मुंबई वृत्तसंस्था । सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने उडी घेतली आहे, तेव्हापासून नवनवीन खुलासे होत आहे. आता एनसीबीने अमली पदार्थांचं सेवन आणि व्यवहार केल्याप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक केलं आहे. रविवारी सुरू असलेल्या चौकशीत एनसीबीची टीम रियाला अटक करेल असं वाटत होतं मात्र रविवार आणि सोमवारी चौकशी अपूर्ण राहिल्यामुळे रियाला आज मंगळवारी पुन्हा बोलावण्यात आलं. अखेर मंगळवारी एनसीबीने रियाला अटक केली.

एनसीबीची टीम सध्या रियाच्या अटकेचा मेमो तयार करत आहे. एकदा अटकेचा मेमो तयार झाल्यावर तिला वैद्यकीय चाचणीसाठी नेले जाईल. सध्या ती एनसीबी पथकाच्या ताब्यात आहे. आता कागपत्रांची जुळवाजुळ सुरू आहे आणि त्यानंतर रियाची मेडिकल आणि कोरोना टेस्ट केली जाईल. नंतर रिया चक्रवर्ती यांना अटक केली जाईल.

आतापर्यंत रियाने ती कोणतंही व्यसन करत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र सोमवारच्या चौकशीत तिने सिगारेट आणि मद्यपान करत असल्याचं मान्य केलं. ती स्वतः अमली पदार्थांचं सेवन करत नसून फक्त सुशांतसाठी मागवायची असंही तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे.

आज मंगळवारी मी केवळ सुशांतसाठी ड्रग्ज मागवत होते पण कधीही ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं रियानं सीबीआय चौकशीत सांगितलं होतं. पण आता एनसीबीच्या चौकशीत मात्र तिनं ड्रग्ज घेतल्याचं कबूल केलं आहे. ड्रग्ज घेतल्याचं मान्य केल्यानंतर सुशांतनंच तिला जबरदस्तीनं ड्रग्ज घेण्यासाठी भाग पाडलं होतं, असं रियानं म्हटलं, असल्याची माहिती आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर सुसान वॉकरविरोधात तक्रार दाखल केली आहे. सुशांतने डॉक्टरांचा सल्ला घेतला असला तरी ही गोष्ट फार गोपनिय असते. याचा खुलासा केला जात नाही. डॉक्टरांनी वैद्यकीय तत्त्वांचं उल्लंघन केलं, असा आरोप कुटुंबाने केला आहे.

अंमली पदार्थ टोळीविरुद्ध जोमानं कारवाई सुरू झाली आहे. या अंमली पदार्थ टोळीची नस तंतोतंत ओळखणाऱ्या मराठी अधिकाऱ्याकडं या कारवाईचे नेतृत्व आहे. समीर वानखेडे यांनी वर्षभरापासून कैलाश राजपूत टोळीचे पंख कापण्यास सुरुवात केली आहे.समीर वानखेडे हे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय युनिटमधील सहसंचालक आहेत.

रियाचा भाऊ शौविक व सुशांतसिंहचा व्यवस्थापक सॅम्युएलचा अंमली पदार्थांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीने मुंबईत विविध ठिकाणी छाप्याची कारवाई सुरू केली आहे. समीर वानखेडे यांनी डीआरआय अंतर्गत या अंमली पदार्थ टोळीवर अंकुश ठेवला आहे. त्यांना टोळीची पूर्ण माहिती असल्याने या कारवाईसाठी वानखेडे यांना खास डीआरआयमधून बोलविण्यात आले आहे.

Protected Content