रावेर शहरात बारागाड्या ओढत असतांना मोठा अनर्थ टळला!

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात अक्षय तृतीया निमित्त दरवर्षीप्रमाणे बारागाड्या ओढत असतांना मोठा अनर्थ टळला ठरलेल्या रूट वरुन गाड्या दुसऱ्याच रूटकडे वळल्याची घटना घडली याची रावेर शहरात एकच चर्चा होती.

अक्षयतृतीया निमित्त रावेर शहरतील छत्रपती शिवाजी चौक परिसरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी भगत म्हणुन बाळु महाजन तर बगले म्हणून जिवन महाजन दिपक पाटील हे सहायक होते. बारागाड्या ओढत असतांना संत तुकाराम महाराज मंदीरजवळ बारागाड्याने रूट बदलुन दुसऱ्या दिशेला जात असल्याचे लक्षात येताच आयोजकांनी सर्व गाड्या थांबवल्या व परत मागे ओढुन पूर्वीच्या रूटवर ओढण्यात आले. यावेळी बारागाड्यावर बसलेल्या युवकांची चांगलीच दमछाक झाली. यामुळे रावेर शहरात मोठा अनर्थ टळला. यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन, गणेश महाजन, भावलाल महाजन, अशोक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता डी .डी. वाणी, शैलेंद्र अग्रवाल, समाधान महाजन, किरण माळी, रजनीकांत बारी ,आदीनी यावेळी परिश्रम घेतले. पोलिस निरीक्षक कैलास नागरे, सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Protected Content