रावेरात मराठा समाजातर्फे वधु-वर परिचय पुस्तकाचे प्रकाशन

रावेर प्रतिनिधी । रावेर येथे मराठा मंगल कार्यालयात मराठा समाजा तर्फे आयोजित वधु-वर परिचय असलेल्या रेशिमबंध पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलक यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रांताधिकारी लडकल म्हणाले की, मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या व शिक्षणात मागे असणाऱ्‍यांची संख्या जास्त आहे. यांच्या मदतीसाठी मराठा समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. कधी काळी गट-तटामध्ये विभागलेला मराठा समाज आज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एका छताखाली आला. याचा मला सर्हष अभिमान आहे. परंतु सद्या मराठा समाजात गरीब जास्त गरीब होतोय. त्यांच्या पाठीशी मराठा ताकद उभी करण्याची गरज असून शेती, राजकीय, प्रशासकीय, व्यापार, लघुउद्योग असो किंवा रोजगार देण्याचा विषय असो यात प्राधान्य मराठा समाजातील  युवक/युवतीना देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी आमदार अरुण पाटील उद्योजक श्रीराम पाटील तहसीलदार महेश पवार गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल मुख्यधिकारी रविंद्र लांडे, गोपाळ दर्जी,मोटर वाहन निरिक्षक संतोष पाटील पंचायत समिती सदस्य योगेश पाटील सि एस पाटील घनश्याम पाटील आर बी महाजन जे के पाटील योगराज पाटील घनश्याम पाटील,पि आर पाटील प्रा सि एस पाटील आदी मराठा समाजातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.यावेळी ५८ युवती तर ८५ युवकांनी विवाहसाठी रेशीमबंध पुस्तकात नाव नोंदले आहे.

 

अनावश्यक खर्च टाळुन मराठा मुलांनी विवाह करावा; दिपाली कोतवाल

दरम्यान गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मराठा समाजाने विवाहसाठी अनावश्यक खर्च टाळुन साध्या पध्दतीने लग्न करावे ज्यांना विवाह करायचा असेल त्यांच्यासाठी रेशीमबंध वधु-वर पुस्तक एक नामीसंधी असल्याचा सल्ला त्यांनी भावी युवक युवतींना दिला आहे.

Protected Content