राज्यातील सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा : सुभाष देसाई

subhash desai

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात इंग्रजीसह सर्व भाषिक शाळांमध्ये १० वीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या कायद्याचा मसुदा अंतिम टप्प्यात असून २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनी हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती भाषामंत्री सुभाष देसाईंनी दिली आहे.

 

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले होते. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात १० वीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी आगामी अधिवेशनात कायदा करणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. इंग्रजीसह सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. आगामी अर्थसंकल्प अधिवेशानत कायदा करणार असल्याचेही सुभाष देसाई यांनी जाहीर केले आहे.

Protected Content