राजस्थानमध्ये भीषण अपघात ; ११ जण जागीच ठार

जोधपूर (वृत्तसंस्था) राजस्थानमध्ये झालेल्या भीषण अपघातात ११ जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये चार पुरुष, सहा महिला आणि एक बालकाचा समावेश आहे.

 

बालोतरा फलौदी राज्य मार्गावर मोठ्या ट्रकने जीपला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भयंकर होता की ट्रकखाली जीप चिरडली गेली. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजुला करण्यात आली. यानंतर मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून मृतांमध्ये नवविवाहित जोडपे असल्याचे सांगितले जात आहे. तर या अपघातातील अन्य तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Protected Content