मुंबई : वृत्तसंस्था । संजय राऊत यांनी शरद पवार यांची युपीएसाठी सुरू असलेली वकिली बंद करावी असा इशारा आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते भिवंडीत बोलत होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आता वाद पेटल्याचे दिसून येत आहे. विशेष करून शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे अशी अनेकदा मागणी राऊत यांनी केली असून यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले आहेत. या वक्तव्यावरून पटोले संतापले आहेत.
संजय राऊत उठसूट काँग्रेसविरोधात बोलत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल, राज्यातील ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आलेय, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे असा इशारा दिला आहे. तसेच राऊतांनी युपीएसाठी शरद पवारांची वकीली बंद करावी असेही बजावले आहे.