रवी राणांनी मागे घेतला खोक्यांचा आरोप !

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केल्याने गहजब झाल्यानंतर राणा यांनी आज आपले शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.

माजी मंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. या पार्श्‍वभूमिवर काल मध्यरात्रीच्या सुमारास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांची समजूत काढण्यात आली.

या बैठकीनंतर आज सकाळी आमदार रवी राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गुवाहाटी येथे जाण्यासाठी माझ्याकडून झालेला खोक्यांचा आरोप मी मागे घेत आहे. राज्यात झालेले सत्तांतर हे जनतेच्या हिताचे आहे. या आरोपामुळे बच्चू कडू आणि अन्य आमदारांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण शब्द मागे घेत दिलगिरी मागत असल्याचे रवी राणा म्हणाले.

Protected Content