यावल येथे काँग्रेस आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन

1e0134b7 896b 44fa 8f08 061aba185ea2

यावल (प्रतिनिधी) देशातील भाजपा प्रणीत एनडीएचे शासन गेल्या साडेचार वर्षात सर्व विषयांत अपयशी ठरले आहे. मग तो देशातील कष्टकरी शेतकरी बांधवांचा मुदा असो, बेरोजगारीचा मुदा असो, भ्रष्टाचाराचा मुदा असो, या सर्व विषयांना देशातील जनता विसरणार नसल्याचे मा. आ. शिरीष चौधरी यांनी आज येथे म्हटले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते बोलत होते.

 

यावल-फैजपुर रोडवर काल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडी प्रचार कार्यालयाचे उदघाटन मा.आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी माजी आ. रमेशदादा चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाधक्ष प्रा. मुकेश येवले, यावल पंचायत समितीचे गटनेता शेखर सोपान पाटील, पंचायत सामितीचे मा. उपसभापती लिलाधर विश्वनाथ चौधरी, काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, जिल्हा परिषदचे सदस्य आर.जी. पाटील, हाजी याकुब शेख चांद, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रेमचंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदीवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष एम.बी. तडवी, नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, समीर शेख बशीर मोमीन, गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर, माजी नगरसेवक भगतसिंग पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दिनकर सिताराम पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे यावल तालुका अध्यक्ष वसंत गजमल पाटील, कोरपावली सरपंच जलील पटेल, पुंडलीक बारी कॉंग्रेसचे प्रविण घोडके, शहर अध्यक्ष कदीर खान, राजु पिंजारी, अलीम शेख, राहुल बारी, राष्ट्रवादीचे देवकांत पाटील, यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी हाजी शब्बीर खान, भगतसिंग पाटील, प्रा. मुकेश येवले, एम.बी . तडवी यांना भाजपा शासनावर चौफेर शाब्दिक हल्ला चढवत व निष्क्रीय कारभार असल्याची टीका केली. या उदघाटन कार्यकर्माचे सूत्र संचालन अमोल भिरूड यांनी केले.

Add Comment

Protected Content