यावल एसटी आगारातून ग्रामीण क्षेत्रातील बससेवा सुरु करा

 

यावल प्रतिनिधी । येथील एसटी आगारातून लॉकडाऊन जाहीर झाल्याने बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. परंतु, आता जिल्ह्यासह राज्यातील बससेवा सुरळीत झालेली असतांना यावल आगारातून ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही सुरु करण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमट असून प्रभारी आगर व्यवस्थापकांनी ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी केली आहे.

मागील आठ महिन्यापासुन संपुर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव वाढु नये याकरिता शासनाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभुमीवर एसटी महामंडळाने संपुर्ण राज्यात बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मागील दोन महिन्यापासून जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्याही झपाट्याने कमी झाली आहे. सर्वत्र एसटी बस सेवा ही पूर्ववत करण्यात आली असतांना यावल आगाराच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्रातील जवळपास सर्व बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामीण परिसरात राहणारा शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरीकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बससेवा पुर्णपणे बंद असल्याने नागरीकांना पर्यायी व्यवस्था म्हणजे इतर खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनाने जास्त पैसे देवुन प्रवास करावा लागत असल्याने यावल एसटी आगाराच्या या दुर्लक्षीत कारभाराचा त्रास ग्रामीण नागरीकांना होत असल्याने महामंडळाने तात्काळ ग्रामीण क्षेत्रातील बससेवा सुरू करावी अशी मागणी होत आहे.

Protected Content