मोदी सरकारचे लसीकरण धोरण काही उद्योगपतींच्याच लाभाचे ; राहुल गांधींची टीका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सामान्य माणूस रांगेत लागणार. वेळ , संपत्ती, आरोग्य आणि जीव गमवणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार,” अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या लसीकरण धोरणावर केली   आहे.

 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती आहे. प्रचंड वेगानं रुग्णवाढ आणिमृत्यूंची संख्या काळजीत भर टाकू लागली आहे. संक्रमण  नियंत्रणात आणण्यासाठी विविध राज्यांकडून उपाययोजना केल्या जात असून, केंद्रानंही लसीकरणाला वेग देण्यासाठी परदेशी लसींच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे. दरम्यान, केंद्राच्या लसीकरण रणनीतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

 

यापूर्वीही राहुल गांधींनी लसीकरण धोरणावरून केंद्राला लक्ष्य केलं होतं. “केंद्र सरकारचे लस धोरण भेदाभेद करणारे असून धोरणामध्ये दुर्बल घटकांसाठी लशीची हमी देण्यात आलेली नाही. दुर्बल घटकांना लशीची हमी नाही, केंद्र सरकारची भेदाभेद करणारी रणनीती आहे, वितरणाची रणनीती नाही,” अशा शब्दात राहुल गांधींनी केंद्राला सुनावलं होतं.  स्थलांतरित मजुरांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. प्रादुर्भाव वाढण्याचे खापर जनतेवर फोडणारे सरकार सहकार्याची भूमिका घेणार आहे का,” असा सवालही त्यांनी केला होता.

Protected Content