मोदीजी देशाला इतकेही मुर्खात काढू नका ; जितेंद्र आव्हाडांची जोरदार टीका

मुंबई (वृत्तसंस्था) मला वाटले मोदी आजच्या संदेशात वेगळे काही सांगतील. भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्कची कमतरता पडू देणार नाही. पण मोदींनी तर संकटातही इव्हेंट करायचे ठरवलंय. मोदीजी देशाला इतकेही मुर्खात काढू नका, अशी बोचरी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या आवाहानावर जितेंद्र आव्हाड यांनी खिल्‍ली उडवत ट्विटवर म्हटलेय की, मला वाटले मोदी आजच्या संदेशात वेगळे काही सांगतील. भारताने करोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्कची कमतरता पडू देणार नाही, देशासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत, लॉकडाऊनच्या काळात एकही गरीब उपाशी झोपणार नाही, असे काही तरी सांगणे मोदींकडून अपेक्षित होते. पण यांनी तर संकटाच्या काळातही इव्हेंट करायचे ठरवले आहे. अंधार करा आणि बॅटरी पेटवा. मोदीजी देशाला इतकेही मुर्खात काढू नका, असा हल्ला आव्हाड यांनी चढवला आहे.

Protected Content