मुंबईतून उत्तर प्रदेशाकडे चालत निघालेल्या दोन मजुरांचा उपासमारीमुळे मृत्यू

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) लॉकडाऊनमुळे मुंबईतून उत्तर प्रदेशाकडे चालत निघालेल्या दोन मजुरांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे. यातील एकाने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. तर दुसऱ्याचा चालता-चालताच मृत्यू झाला आहे.

 

‘टीव्ही 9 मराठी’ने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईवरुन उत्तर प्रदेशच्या दिशेने जात असतांना चालत-चालत हे मजूर गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. जळगावपर्यंत उपाशीपोटी चालत गेलेले हे मजूर इतके थकले की एकाचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. तर दुसऱ्याने मजुराने थेट पूर्ण नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे मजूर अनेक दिवसांपासून पायी चालत होते. दरम्यान, या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content