मी पक्ष सोडण्याचे कारण शरद पवारांना माहित आहे : गणेश नाईक

मुंबई (वृत्तसंस्था) मी २० वर्ष राष्ट्रवादीसाठी काम केले. आजपर्यंत मला शरद पवार काहीही बोलले नाहीत. मी पक्ष का सोडला याचे कारण त्यांनाही माहित आहे, असा गोप्यस्फोट भाजप नेते गणेश नाईक यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या गणेश नाईक यांनी आपण पक्ष सोडण्याबद्दल पहिल्यांदाच जाहीर वाच्यता केली आहे. तुम्ही पक्षासाठी २० वर्ष काम केले आहे. पक्षाने तुम्हाला तिकीट दिले नाही तर आम्ही सगळे पक्ष सोडणार, असे पुत्र संदीप नाईक, संजीव नाईक यांनी सांगितले होते. त्यामुळेच आपण पक्ष सोडला, अशी कबुली गणेश नाईक यांनी दिली आहे. तर शरद पवारांना माहिती आहे, की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला. त्यांनी अधिकाराने मला सुनावले, तर मी गप्प बसेन, असेही गणेश नाईक यांनी म्हटले आहे.

Protected Content