माझ्याकडे खूप मसाला…वेळ आल्यावर बोलणार : पटोले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांनी केलेल्या आरोपांवर थेट उत्तर देणे टाळत वेळ आल्यावर बोलण्याचा इशारा दिला आहे.

नवनिर्वाचीत आमदार सत्यजीत तांबे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेत. आपल्याला चुकीचा एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टिका केली. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त करतांना प्रखर भाष्य केले नाही. ते म्हणाले की, माझ्याकडे खूप मसाला वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार. मी परवापण सांगितलं, हे जास्त पक्षाच्या अंगावर आणू नका. हा परिवारातला वाद आहे. हा जास्त अंगावर आणला तर माझ्याकडे खूप मसाला आहे. मला त्या लेव्हला जाऊ देऊ नका, असा इशारा मी परवाही दिलेला आहे. मला तेवढं येच्यात नाही जायचंय, असा इशारा पटोलेंनी दिला.

पटोले पुढे म्हणाले की, मी विखेंच्या बद्दल काही दिवसांनी बोलणार आहे. मी एकदम पद्धतशीर बोलणार आहे. आता आमच्या मित्राच्या मागे लागले आहेत. माझे मित्र कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आहेत. आता त्यांची जागा हे घ्यायला पाहत आहेत. मी विखेंवर बोलत नाहीत. नंतर उत्तर देतो.नाशिकमध्ये जो काही सर्वपक्षीय हाय व्होल्टेज झालाय ते सगळ्यांना माहिती आहे. आमचे प्रवक्ते सर्व पुरव्यांनिशी माहिती देतील. त्यावर त्यांनी बोलावं, असं नाना पटोले म्हणाले.

Protected Content