महिलेला चौघांकडून बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पळून जाऊन लग्न केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाचे नातेवाईक असलेल्या ४५ वर्षीय महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली व परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार वडनगरी घडला आहे. समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बुधवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे राहणाऱ्या बेबाबाई गुलाब पाटील (वय-४५) या महिला आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. त्यांचा पुतण्या प्रमोद पाटील याने गावातील एका मुलीसोबत पळून जाऊन लग्न केले. याचा राग मनात ठेवून मुलीचे नातेवाईक शिवाजी जयराम पाटील, ज्ञानेश्वर वासुदेव पाटील, विनायक उमाकांत पाटील आणि योगिता वासुदेव पाटील सर्व रा. वडनगरी ता. जि.जळगाव यांनी मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता बेबाबाई गुलाब पाटील या महिलेला बुक्क्यांनी मारहाण केली व तिच्या संपूर्ण कुटुंबला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात बेबाबाई पाटील यांनी बुधवार १९ ऑक्टोबर रेाजी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शिवाजी जयराम पाटील, ज्ञानेश्वर वासुदेव पाटील, विनायक उमाकांत पाटील आणि योगिता वासुदेव पाटील सर्व रा. वडनगरी ता. जि.जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भालेराव करीत आहे.

Protected Content