महाविकास आघाडीचे शेतकर्‍यांवर नकली प्रेम- उपाध्ये

मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडीचे शेतकर्‍यांवरील प्रेम नकली असून राज्यातच अद्याप शेतकर्‍यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी करून राज्य सरकारवर टीका केली आहे.

शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या शेतकरी आंदोलनास दिग्गजांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिलाय. त्यावरुन भाजपाने शिवसेनचं शेतकरी प्रेम नकली असल्याचं म्हटलंय.

बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॅाग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पुरेशी मदत दिली नाही. दुध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. ना शेतकऱ्यांना कोणती मदत राज्य सरकारने कोरोना काळात केली नसल्याचं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन म्हटलंय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात खासगीकरण सुरू झालं. शरद पवारांचं कृषिमंत्री असताना पाठवलेले पत्र आज समोर आहे, ज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी खासगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीले आहे, असे म्हणत शरद पवारांनीच खासगीकरणाला सुरुवात केल्याचं उपाध्ये यांनी सूचवलंय.

Protected Content