महामार्गावर पथदिवे व गतिरोधक बसवा : जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । कुसुंबा जकात नाका ते विमानतळ या महामार्गावर पथदिवे व गतिरोधक बसविण्यात यावी अशी मागणी  जळगाव  ग्रामीण तालुका काँग्रेसच्या वतीने उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे  निवेदनाद्वारे  करण्यात आली. 

औरंगाबाद महामार्गावर रोज होणाऱ्या अपघातांची मालीका लक्षात घेता या महामार्गावर  गतीरोधक व रात्रीचे अपघात टाळण्यासाठी दुतर्फा हायमस्ट L.E.D.लाईट बसविण्यात यावे यासाठी निवेदन देवून जनतेच्या व्यथा मांडण्यात आल्या,  याप्रसंगी  तालुका अध्यक्ष  मनोज डिंगबर चौधरी , प्रमोद घुगे , उप अध्यक्ष  समाधान पाटील,  सचिन माळी, रविंद्र सोनवणे , संजय पाटील, सागर कुंटुंबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content